नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

भारतरत्न पुरस्काराची सुरुवात


भारतरत्न पुरस्काराची सुरुवात


सुरुवात - २ जानेवारी १९५४


भारतरत्न पुरस्काराची सुरुवात २ जानेवारी १९५४ रोजी झाली.


https://mimarathibana.blogspot.com/2021/01/Bharatratna-in-Marathi.html


भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. क्रीडा, साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लोकांना भारत सरकार तर्फे देण्यात येतो.


१९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरान्त ‘भारतरत्‍न’ देण्याची सोय करण्यात आली.


२०१४ मध्ये साहित्य, कला, विज्ञान, सेवा, शांती, उद्योग क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले. 


आतापर्यंत ४८ जणांना ‘भारतरत्‍न’ हा पुरस्कार लाभलेला आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो.


पहिला भारतरत्न पुरस्कार हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना २ फेब्रुवारी १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


१९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.

भारतरत्न पुरस्कारची रचना

'भारतरत्न’ मेडल ५.८ सें.मी. लांबीचे, ४.७ सें.मी. रूंदीचे आणि ३.१ मि.मी. जाडीचे पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बनविलेले असते. हे कासे धातूचे बनवलेले असते. त्याच्या वरील बाजूवर १.६ सें.मी. व्यासाची सूर्याची आकृती कोरली जाते, ज्याच्या खाली देवनागरी लिपी मध्ये ‘भारतरत्न’ कोरलेले असते. 


https://mimarathibana.blogspot.com/2021/01/Bharatratna-in-Marathi.html


मेडलच्या मागील भागावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य कोरलेले असते. सूर्य, राजचिन्ह व कडा प्लॅटिनमच्या आणि शब्द चमकदार पितळेचे बनवले जातात. हे मेडल पांढऱ्या रंगाच्या रिबीनीमध्ये ओवले जाते. कोलकत्याला असलेल्या टांकसाळीत हे मेडल बनवले जाते.

    आता आपण भारतरत्न पुरस्कार ची माहिती पाहिली .पण भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती ची यादी साठी येथे क्लिक करा..

Link.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.