नवीन पोस्ट..

टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

इमेज
टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ? पोस्टल पत्त्यांचे आकर्षण असलेल्या पिन कोडचा काळ आता संपला आहे आणि भारतीय टपाल विभागाने पर्याय म्हणून 'डिजिपिन' नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. आतापासून देशातील नवीन पत्ता प्रणाली म्हणजे डिजिपिन. पारंपारिक पिन कोड विस्तृत क्षेत्र व्यापतात, तर १०-अंकी डिजिपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. पिन कोड आणि डिजिपिनमधील फरक काय आहेत ते जाणून घेऊया. भारतीय टपाल विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी DIGIPIN प्रणाली सुरू केली आहे. DigiPIN मध्ये 10-अंकी डिजिटल कोड आहे. पारंपारिक पिन कोडऐवजी, जो विस्तृत क्षेत्र व्यापतो, DigiPIN अचूक स्थान माहिती प्रदान करेल. म्हणजेच, या DigiPIN द्वारे तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान शोधता येते. DigiPIN तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन आणि कोड शोधून तुम्ही तुमचे घर शोधू शकता. DigiPIN चा फायदा असा आहे की ते योग्य ठिकाणी पत्रव्यवहार पोहोचवेल आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागांसारख्या आपत्कालीन सेवांना स्थान समजून अचूकपणे पोहोचण्या...

संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची...

 संपुर्ण माहीत पंढरीच्या वारीची...


संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या विठ्ठला ची आज कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी निमित्त आज मी तुम्हाच्या साठी पंढरीची वारी ची माहिती घेसंपुर्ण माहीत पंठरी च्या वारी ची..ऊन आलो आहे

पंढरीची वारी

 वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. 



पंढरीची वारी पंढरीची वारी



पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे.

 वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.


अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.

पंढरीची वारी पंढरीची वारी
 पंढरीची वारी पंढरीची वारी


वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.


वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. 

पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.



संकलन :- सतीश अलोणी ©


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.