नवीन पोस्ट..

आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!

इमेज
                  🥭 आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या!🥭 उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे...  🥭 आंबे खाण्याचे फायदे : 🥭 ● आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे. ● आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.  ● आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.  ● चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो. ● आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते. ● 'व्हिटामिन बी6' मुळे रक्तातील 'होमोसेस्टीना'चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो. ● आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत...

ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे | Benefits of Meditation

   ध्यान (मेडीटेशन) पासून मानसिक व शारीरिक फायदे


Meditation 
मन:शांती, आनंद, आरोग्य, तणाव मुक्तता, चिंतामुक्ती अस खूप काही आपल्याला हवे असते. पण ते कुठे आणि कसे मिळेल हे मात्र माहिती असूनही आपण ते करत नाही. ध्यान जगण्याचे महत्वाचे कार्य म्हणून करायला हवे. ध्यान करत असताना आपण स्वतः सोबत संवाद करत असतो आणि तो संवाद निशब्द असतो. मग आपण स्वतः म्हणजे कोण तर आपला श्वास. हो हा श्वास म्हणजे आपण. आणि हा देह इतरांसाठी आपली ओळख. आनंद, आरोग्य श्वासात दडलेले आहे. आयुष्य जगत असताना आपणच मागे डोकावून बघा कितीदा स्वतः सोबत तुम्ही संवाद साधला आहे. नाही आठवत ना. 
            अहो आपण सकाळी उठलो की हा देह ठीक ठाक ठेवण्यासाठी नको ते उपाय करतो. पण जो तुमच्यात तुम्ही म्हणून आहात त्याचे काय. त्याची काळजी घेता का. ते मन जे हा देह चालवत असते. त्याचे काय. स्वतःचा विसर क्षणो क्षणी पडतोना.... किती चिंतन, विचार, काळजी, तान तनाव असा त्रासदायक फास मनाच्या भोवताली असतो. कमीत कमी थोडा वेळ देऊन तो त्रास बाजूला ठेऊन स्वतःला म्हणजे मनाला मोकळे करू नाही का वाटत? चला तर मग आजपासून स्वतः संवाद साधूया आणि तो मार्ग म्हणजे ध्यान... आपल्या भोवताली असलेला कलह विसरून देहात स्थित प्राण, श्वास, आत्मा, मन म्हणजे अमरत्व असलेले आपण एकरूप होऊन ध्यानस्थ होऊया... 

चला तर मग ध्यानाचे फायदे पाहूया....


ध्यानाचे फायदे |Benefits Of Medition.

* ध्यानामुळे मिळणारा आराम  गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, काम तितकेच जास्त गतिशील.


* ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.

* उच्च रक्तदाब कमी होतो. रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होऊन उगीचच भीती वाटणे असा त्रास होत नाही. मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात. सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.

* ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते.

* एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि मनाचा विस्तार होतो. तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल होतो. त्यामुळे परिपूर्णता येण्यास मदत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.