नवीन पोस्ट..

टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ?

इमेज
टपाल विभागाने सादर केला डिजीपिन, तुमचा डिजिटल पत्ता कसा शोधायचा ? पोस्टल पत्त्यांचे आकर्षण असलेल्या पिन कोडचा काळ आता संपला आहे आणि भारतीय टपाल विभागाने पर्याय म्हणून 'डिजिपिन' नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. आतापासून देशातील नवीन पत्ता प्रणाली म्हणजे डिजिपिन. पारंपारिक पिन कोड विस्तृत क्षेत्र व्यापतात, तर १०-अंकी डिजिपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शवते. पिन कोड आणि डिजिपिनमधील फरक काय आहेत ते जाणून घेऊया. भारतीय टपाल विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी DIGIPIN प्रणाली सुरू केली आहे. DigiPIN मध्ये 10-अंकी डिजिटल कोड आहे. पारंपारिक पिन कोडऐवजी, जो विस्तृत क्षेत्र व्यापतो, DigiPIN अचूक स्थान माहिती प्रदान करेल. म्हणजेच, या DigiPIN द्वारे तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान शोधता येते. DigiPIN तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या सरकारी वेबसाइटला भेट देऊन आणि कोड शोधून तुम्ही तुमचे घर शोधू शकता. DigiPIN चा फायदा असा आहे की ते योग्य ठिकाणी पत्रव्यवहार पोहोचवेल आणि रुग्णवाहिका आणि अग्निशमन विभागांसारख्या आपत्कालीन सेवांना स्थान समजून अचूकपणे पोहोचण्या...

अधिकमासाविषयी संपूर्ण माहिती आणि महत्त्व....


 अधिकमासाविषयी संपूर्ण माहिती आणि महत्त्व






         || श्री पुरूषोत्तम श्रीकृष्णाय नम: ||🚩

 हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे ३५५ दिवसांचे वर्ष असते.

परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते.

म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास वर्षात सौरवर्षापेक्षा कमी असतात आणि हा ११ दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर तीन वर्षांनी (अचूकपणे सांगावयाचे झाल्यास ३२ महिने १६ दिवसांनी) एक महिना अधिक धरावा असे सांगितले आहे.


दर महिन्याला सूर्य एका राशीतून संक्रमण करतो परंतु या अधिक तेराव्या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसते म्हणून याला 'मलमास' असे सुद्धा म्हणतात. व त्यास पुढील चांद्रमासाचे नाव देतात.

     चैत्र पासून अश्‍विन पर्यंतच्या ७ मासांपैकीच एखादा अधिक मास असतो. कारण या काळात सूर्याची गति मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यास ३० दिवसांपेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिकमास पुन्हा १९ वर्षांनी येतो.

🌹या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण, भगवान विष्णु, पुरुषोत्तम (या मासास पुरुषोत्तम मास असेही म्हणतात ).

म्हणूनच या महिन्यात विशेषकरून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात, तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम आदीमुळे सुखशांती, संसारसुख मिळते.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

Please Do Not any Spam link in Comment Box
Thanks for come here 🤗
Visit Again ☺️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

शिंगाडा चे १२ आरोग्य फायदे जे आपल्याला माहित असले पाहिजेत

कफ व खोकला यावरील उपाय.